आपल्याला माहीत होतच
पहिल्यापासून की शक्यतो
आपलं लग्न होणं
अवघड आहे ...
पण तरी आपण
जगाची नजर चूकवून
भेटत राहीलो
जणू की आपल्य़ाला
हेही माहीत होतं की शक्यतो
लग्न वेगळं अन हे वेगळं ...
मिळालेल्या संधीचे नि काळाचे
आपण धनी झालो
पण जाता जाता
एकमेकांच्या मनावर
वळ उमटवत गेलो ...
आपल्याला माहीत असल्यासारखे
की अशा
जखमा केल्याशिवाय
पुरतं दूर होणं
शक्यच नव्हतं म्हणून...
आज याच शहरात
वावरतो आहोत
आपण दोघे...
दोघांच्याही मनात
रोजरोज तिच आंदोलन...
एकमेकांविषयीची...
पण आता दोघांच्याही
मनाचे मालक
वेगवेगळे
योगयोगानं रस्त्यात
दिसतोही आपण
एकमेकांना
पण दोघेही
टाळून जातो
एकमेकांची नजर...
मनाची वळणे ...
दोघांनाही पक्क
ठाऊक असल्यागत की
आता भेटलो तर....
No comments:
Post a Comment