Thursday, November 24, 2011

साहब, आप चलो न हमरे घरको।


- " साहब, आप चलो न हमरे घरको।
दो-चार रोज मजा करेंगे।"

- "आ सकता हूं हरीषभाय,
लेकिन डर लगता है।
अगर गांववालोंको पता चला के मैं महाराष्ट्रसे आया हूं तो...? "

- "अरे क्या साब? हमरे गावके लोग इधर जैसे नहीं है।
दिन-रात आपका खयाल रखेंगे।
आयोध्या मंदिर घुमायेंगे। नदियां नहायेंगे।
लेकीन कोई आपको हाथ लगाने की सोचेगाभी नही साहऽऽब. कसमसे."

- "एक बात बताओ;
इधर जब तुम्हारे विरुद्ध आंदोलन उठता है
तो तुम क्या करते हो?"

- "क्या करने का साब,
दो-चार दिन चुपचाप बैठने का...
बाहर किसीसे कोई बात नहीं करनेका। और क्या ?"

- गांवसे घबराके बीबीका फोन नहीं आता घर आओ बोलके ?”

- आता है न साब| मगर क्या करें ?
काम छोडके घर थोडेही बैठ सकते है?
दंगा फसाद तो दो-चार दिन की बात रहती है|
सचमुच साब चलो न एकबार

- अरे अभी नहीं| फिर कभी पक्का|
अभी तो दिवाली मनायेंगे| फटाके फोडेंगे|”

- क्या साब ?
एक बार हमारीभी दिवाली देखो|
हमारे यहां आप जैसी खिलौनोकी पिस्तौल नहीं होती
वोह क्या बोलते है आप?
कट्टा कट्टाउसमें छर्रे भरनेका और हवामे उडानेका| बस्स|
पुरे गावमे जश्न होता है जश्न|

चलो न साहब ... हमारे घरको|

Monday, November 21, 2011

तुझ्यावरची कविता


ये तुला उलगडून दाखवीन
तुझी एक कविता.
तू करशील स्पर्श एकेक अक्षराला
जी तयार झालीयेत फक्त आपल्याच लीपीने.
तू फिरवशील बोट
भूतकाळातून ठिपकलेल्या नितळ दवावर.
तूच बोलून गेली होतीस ओघानं
"माझ्यावर लिही नं एकदा कविता"
तेव्हा पासुनचाच हा प्रवास आतल्या वळणाचा.

कविता सुचलीय खरी
पण शब्द नाहीसे झालेत समजून उमजून.
आपल्या दोघांत उगाच शब्दांची अडचण नको म्हणून.
अन् तसंही तूच लिहायाचीस काविता आपल्यांत शब्दांशिवाय.
मी नेणीव-जाणिवेच्या काठावर. तंद्रीत.

तू कोण? मी कोण?
कविता कोण?
हे प्रश्न मुळाचे. आदिम-अनादी.
भरात आलेला भुंगा आणि
कह्यात आलेलं फुल
कविते वाचून राहूच शकत नाही.
ते भविष्य घेऊन
भूतकाळ पेरीत जाणारच. संदर्भासहित.
अन् मुळाचं सांगायचं तर
ते प्रश्नांशिवाय जगूच शकत नाही.
अन् आपण प्रश्नांसहीत.
आठवतंय?
आपण आपले कितीतरी प्रश्न टाळून
बसून राहायचो मुळाशी निवांत.
म्हणूनच होत राहिल्या आपल्यांत कविता.

अन् आठवतंय?
तू दिली होतीस एक कोरी वही
’सप्रेम भेट’ न लिहिता .
मला हव्या त्या मजकुराची मुभा देऊन.
अन् तेव्हाही मी भरवून टाकली होती एकेक ओळ.
शब्दांशिवाय.
तर तीच तुझी आवडती कविता झाली होती.

आता त्याच वहीत तेच शब्द
गिरवून दृष्यं करायचे म्हंटले तरी
अर्थाचं काय?
पुन्हा लागेल तुला तोच अर्थ तंतोतंत ?
की तुला देऊ करायचेत नवे अर्थ?
पण पुन्हा तू बोलणार अशी काहीच नाहीस त्याही वेळी.
मी गिरवून मोकळा झालो तरी.
हे मलाही माहिती आहे
यापैकी आता काहीच होऊ शकत नाही.
पण एक जाणवतंय
आपण याही वेळी जन्म देतोय नव्या कवितेला. शब्दांपार.
तू आलीस की दाखवीन उलगडून
तुझी एक काविता.

Friday, November 18, 2011

तोवर

तू अन् मी
मध्ये वगैरे वगैरे.
दोघांचेही तळहात एकमेकांवर जुळवत राहायचो आपण
पण जुळायचे नाहीत कधी.
दरम्यान स्पर्श होत राहिले.
चुटपुटते किंवा घट्ट
पत्रिका, भविष्य, तळहातांच्या रेषा
न बघताच आपण तुटत गेलो एकमेकांपासून
तेही फार बरं झालं.
हा अखंड श्वास मरेपर्यंत
कुणाच्या तरी नावावर लिहिला जाऊ शकतो
कुठल्याही हेतुशिवाय.
हे माहितीच नव्हतं मला तोवर.

Thursday, November 17, 2011

या शांततेत

मनात आत्महत्येचा विचार करत
मी सावरतोय तोल गाडीचा
भर रस्त्यात.
या अवाढव्य गोंगाटात
आपलंच मौन किती सलतंय आपल्याला.

माझी असह्य तिडीक जराही लक्ष देत नाहीये
आजूबाजूच्या गर्दीकडे.
आज काय तो सोक्ष-मोक्ष लावायचाय एकदाचा
मिटवून टाकायचेत सगळे रोजमर्राचे प्रश्न.

सिग्नल पडलाय मध्येच.
समोरच्या बाईकवर निसटती जीन्स घातलेली मुलगी
घट्ट चिकटलीय पुढच्याला.
तिचा तंग-आखूड टॉप
गुरुत्वाकर्षणाचे सगळे नियम मोडून काढतोय ऐन चौकात.
मी वेधला गेलोय
तिच्या उभ्या ठळक रेषेमध्ये खोल.

आता सिग्नल सुटलाय. मीही सुटलोय.
उभ्या रेषेच्या खोलीत डोकावत त्याच वेगात.
पुढच्या सिग्नालाही मी मागेच थांबलोय तिच्या.
आजुबाजुचेही बहुतेक जण तिथेच खिळलेले आहेत आपापल्यापरीने माझ्यासारखेच.
रस्ते वेगळे होताहेत यथावकाश सिग्नल सुटताना.

मीही अगदी सहज, हलक्या डोक्याने घराकडे वळलोय.
घरात शिरताना प्रेमळ स्वरात बायको म्हणतेय;
झाला वाटतं पारा शांत
मीही हसून अनुमोदन देतोय तिला.

रात्री आडवा होताच उभी खोल रेघ मानात येतेय तिची.
अन रात्रीचा पारा चढत चाललाय खोलवर.
बायकोवरचा राग, आत्महत्येची तिडीक
कुठल्या कुठे हरवून गेलीय
या शांततेत.

Friday, November 04, 2011

परवा मेली बरका कविता

परवा मेली बरका कविता
थकली होती; खचलीही होती
डोळ्यांत उघडं आकाश ठेऊन
मुठीत थोडी माती घेऊन
शांत सहज गेली कविता।




जुनंच खोड ते भलतं काटक
-रानावनात घडलेलं, डोंगरद-यांत घुमलेलं,
उन्हातान्हात काट्याकुट्यात
अनवाणी फिरलेलं.




हसतमुख होतं तसं गूढही होतंच
उगा गेली नाही कुणाच्या वाट्याला
पण तिच्या वाटेत जे जे आले
ते सरले बुवा आपसूक मागे




तिच्या झोळीत गोटा होता की काय
ते कळलं नाही.
- आणि आताशा तर ती झोळीही दिसत नाही. असो.



पण म्हातारी सुटली एकदाची.
ते बरंच झालं.
तसे म्हणायला सगळे सोयरेच इथे
तिचं नाव घेतल्याशिवाय
कुणाचा दिवस गेला नाही खरा
पण ...
दिवसेंदिवस हाडं वर येत चालल्याचं कळत होतं.
उपाशी पोट तगणार तरी किती ?




गावातला येडा तुक्या तरी
तिला द्यायचा भाकर रोज.
-स्वतः अर्धपोटी राहून.
काय जमलं होतं त्यांचं
ठाऊक नाही;
पण तो आला की ती
उघडून ठेवायची सगळी झोळी त्याच्या पुढ्यात
अन् तो नाचायचा खुशाल एकतरी लावून.



लोक गमतीनं पाहायचे
सोयीनं ऐकायचे
धोरणानं बोलायचे त्यांच्याबद्दल.
पण भाकरी दिली नाही काढी कुणी
ना त्याला ना तिला.



एक दिवस तुका
चालता बोलता देवाघरी गेला.
त्या दिवशी पहिल्यांदाच
त्या म्हातारीच्या त्या कवितेच्या
डोळ्यांत पाणी होतं.
पण टाहो नव्हता. खंत नव्हती. शब्दही नव्हते.
होती ती शांतता आणि गुढता.



तुका गेला म्हणून म्हातारी इतक्या लवकर जाईल
असं वाटलं नव्हतं.
बाकी आता गावगाडा चालू आहे
आहे तसाच.
जरा कलकलाट वाढलाय आणि
देवाच्या गाभाऱ्याला नवीन चकचकीत कुलूप आणून लावलाय
इतकंच...!

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...