Tuesday, May 25, 2010

सल

आपल्याला आजही
अक्षम्य वाटतात त्यांच्या
’न’ आणि ’ण’ च्या उच्चारातील
व्याकरणात्मक चूका...

ते आयुष्यभर मागत राहीले
"पानी पानी" हक्काचं
शेवटी त्यांनी आपल्या
रक्ताचंच पाणी केलं
आणि जे व्हायला हवं होतं
तेच झालं .

पण आपण आजही
सोडत आहोत
आपल्या प्रव्रूत्तींचे
टोकदार बाण
त्याच लक्षावर
व्याकरण चालवून...

ते घायाळ होऊन
पानीच मागताहेत हक्काचं
आणि त्यांच्या
उच्चारातला ’न’
आप्ल्याला फ़ार
खोलवर सलतो आहे

: कमलेश कुलकर्णी

No comments:

Post a Comment

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...